शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी व मोबाईल सिडींग करावी अन्यथा धान्य होईल बंद.. दिपक बाजड तहसिलदार शेगांव यांचे आवाहन तालुक्यात केले ई-केवायसी कॅम्पचे आयोजन(tahsilnews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

tahsilnews:शेगांव तालुक्यातील शिधापत्रिका धारक ग्राहकांनी ई-केवायसी करुन घेण्याबाबत चे आव्हाण तहसिलदार दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी पुरवठा संतोष बावणे यांनी केले आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना शासकीय धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

त्यासाठी दिनांक 06/02/2025 पासून 28/02/2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत नेवून आपल्या गावातील स्व् स्त् धान्य दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ आपले ई- केवायसी पुर्ण करुन घ्यावे.

केवायसी करण्यासंबधीत लाभार्थी यांनी रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून पॉस् मशीनवर बायोमॅट्रीक करावे. ई-केवायसी पुर्ण न केल्यास अन्न धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

tahsilnews:ई-केवायसी पुर्ण न केल्यामुळे अन्न धान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची जबाबदारी ही संबधीत लाभाथ्यांची राहील असे आवाहन तहसिलदार शेगांव दिपक बाजड यांचे माध्यमातून निरीक्षण अधिकारी संतोष बावने व पुरवठा निरीक्षक किसन केणे यांनी केले आहे.

Leave a Comment