भारतीय कायद्यात झालेला बदल आपण स्वीकारला पाहिजे – सपोनी संतोष चव्हाण ( policenews )

0
2

 

विकी वानखेडे यावल / जळगाव

policenews:भारतीय कायद्यात झालेला बदल हा आपण स्वीकारला पाहिजे ग्रामीण भागात कायद्याचे नियमांचे पालनही अधिक काटेकोर पणे केले पाहिजे यात फौजदारी कायदा,भारतीय पुरावा कायदा , हिट अँड रन ,मॉब लिचिंग या कायद्यात झालेला बदल तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देखील काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.

एखाद्याला जामीनदार होण्यासाठी देखील आपण त्याबाबतची माहिती ठेवने आवशयक आहे. जूने गुन्हे देखील आता नवीन कायद्याने चालणार आहे.रस्ता अपघात यातही बदल झालेला आहे.

प्रत्येकाने गाडीचे कागदपत्रे व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे आहे. गुन्हेगारास पळवाटा कमी आहेत. गाडीचा अपघात होऊन पळाला तर त्याला जामीन ही लवकर मिळणार नाही.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

आहे अशी माहिती अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी दिली यामुळे आपण स्वतः ही या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि सोबतचे नातेवाईक यांना देखील याविषयीची माहिती द्यावी.

तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांनी तर गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर रहावे अशी मागणी सपोनी चव्हाण यांनी दिली अजूनही गावा गावात कोर्टा मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत असे की चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिनांक ६ रोजी संध्याकाळी अडावद पोलीस ठाण्याकडून नवीन कायद्याविषयी ची माहिती देण्यात आली

policenews:यावेळी अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण माजी उपसभापती माणिकचंद महाजन सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी भुसावळ पतपेढी संचालक प्रशांत सोनवणे पोलीस हवालदार नाशीर शेख सतीश भोई ग्राम पंचायत सदस्य सावन महाजन रवींद्र शिरसाठ क्रीडाशिक्षक देविदास महाजन पोलीस पाटील रविंद्र कोळी सावदा तलाठी रशीद तडवी राजू पाटील आरिफ तडवी आशाबाई बोदडे हितेंद्र पाटील दिपक गुजर प्रवीण कोळी सिकंदर तडवी विजय पाटील जितेंद्र कुंभार मस्तुफा शेख तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here