Home Blog Page 465

किनगाव खुर्द गावातुन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पोलीसात तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव गावातुन घरासमोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी वय४२ वर्ष राहणार किनगाव खुर्द हे दिनांक २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपुर येथे गेले होते ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवुन गेल्याची बाब दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावर समजले , अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सिके ४७६५हे दुचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली असुन , यावल पोलीस स्टेशनमध्ये सत्तार बिस्मिल्ला पिंजारी यांनी दिलेल्या माहीतीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवी कलम३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे

दहिगाव येथे विहीरीत उडी घेवुन एका महीलेची आजारास कंटाळुन आत्महत्या पोलीस अक्समात मृत्युची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथे एका महीलेची आजारास कंटाळुन विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन, याबाबत पोलीस स्टेशनला अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापुर्वी दहिगाव येथील राहणाऱ्या कोकीळाबाई प्रकाश पाटील वय६oवर्ष यांनी आजाराला कंटाळुन नायगाव रोडवरील दहीगाव शिवारातील राजु दगडु पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केली आहे . याबाबतची खबर मयत महीलेचे मेहुणे छन्नु पाटील राहणारे नेरी ता . जामनेर यांनी यावल पोलीसात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे .

श्री क्षेत्र देहूगाव नगरपंचायत कर्मचार्‍यांचा सावळा गोंधळ

0

 

पाणी पुरवठा न करता नागरिकांना धरले वेठीस

संत तुकाराम सोसायटी, नवीन बायपास रोड, वडाचामाळ, श्री क्षेत्र देहुगाव येथे नवीन नळ जोडणी करुन देखील नागरिकांना गेले ७ ते ८ दिवस पिण्यासाठी पाण्याचा थेंबही नाही.
विचारणा केली असता प्रत्येक वेळी, वेगवेगळी कारणे सांगून उडवा उडवीची उत्तर दिली जातात. सकाळी विचाल असता दुपारी पाणी येईल, दुपारी विचारले असता पहाटे पाणी येईल अशी उत्तरे दिली जातात. सर्व नियम व अटींचे पालन करून नवीन नळ जोडणी कनेक्शन घेतले असता अजून पर्यंत एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. आजुबाजुच्या भागात पाणी पुरवठा केला जातो परंतु संत तुकाराम सोसायटी मध्ये आज तागायत पाणी पुरवठा झालेला नाही.
कोणाच्या सांगण्या वरून अशी अडवणूक केली जाते किंवा अडवणूकीचे कारण काय नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाचेे कर्मचारी हे काही उत्तर देत नाही.
या भागात गेले ६ ते ७ वर्ष स्थानिक प्रशासना कडुन कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, पक्का रस्ता ना रस्त्यावरील दिवे. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.
२०२१ पर्यंत पुर्ण कर भरून देखील या भागातील नागरिक सर्व सुविधांपासून वंचित आहेत.

गणी पेट्रोल पंप जवळ मोटर सायकल व टिप्पर मध्ये भीषण अपघात 35 वर्षीय इसम ठार

0

 

सुनील पवार नांदुरा

नांदुरा शहरातील गनी पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास अपघात होऊन पस्तीस वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भागवत श्रीकृष्ण पिवळसर रा. वार्ड क्र. 1 नांदुरा असे मृतकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की नांदुरा शहरातील गणी पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल एम एच 28 AQ 7803 व टिप्पर क्रमांक एमएच 21 X 1709 यांच्यामध्ये अपघात झाल्याने मोटरसायकलस्वार ऍड. भागवत श्रीकृष्ण पिवळतकर गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले असता. वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचाराकरिता खामगाव येथे हलविण्यात सांगितले उपचाराकरिता खामगाव येथे नेत असतानाच सदर इसमाचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंकलना पर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नाही तर पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

बोराळे- चुचाळे येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ आरोग्य तपासणीस उपक्रमास पुन्हा सुरुवात

0

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चुंचाळे येथे दि.२५ मार्च पासून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवाडीवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य तपासणीस उपक्रमास पुन्हा सुरुवात झाली आहे.
कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरोघरी आशा वर्कर, शिक्षक ,अंगणवाडी सेविका यांच्या दोन टीम चुंचाळे व एक टिम बोराळे गावात जाऊन प्रत्येक घरा- घरात प्रत्येक व्यक्तीला तपासून कोरोना संशयित रुग्ण शोधून त्यांना तपासणी साठी प्रा.आ. केंद्रात पाठवीत आहे.त्याचबरोबर अँटीजन टेस्ट करणे ही सुरू आहे.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण निघेल त्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे काम प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत करणे चालू आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहेच.तरी सर्वाना प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आलेल्या टीमला सहकार्य करा व कोरोनाचे लक्षण असल्यास टेस्ट करून घ्या व प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी हातभार करा.असे आवाहन साकळी आरोग्य प्रशासनातर्के डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवडीवाले, बोराळे येथील ग्रामसेवक राजू तडवी, चुंचाळे येथील ग्राम सेविका प्रियंका बाविस्कर, यांनी केले आहे.
याकामी आशा स्वंयमसेविका जयश्री चौधरी,सलीमा तडवी, शिक्षक मजित तडवी, राजु सोनवणे,प्रंशात सोनवणे, अंगणवाडी सेवीका लतीका कोळी.बोराळे आशा वर्कर सुनयना राजपुत आदी परीश्रम घेत आहे.
फोटो….चुंचाळे ता.यावल येथे माझे कुंटूब माझी जबाबदारी अंतर्गत तपासणी करुण घेताना मधुकर साखर कारखाना चे संचालक नथ्थु रमजान तडवी

अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांचा व महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 27 युवकांचा व महिलाचा पक्ष प्रवेश अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण ,अमोल बोरकर जिल्हा उपाध्यक्ष ,सुनिल भुते वर्धा जिल्हा सचिव ,राहुल सोरटे वर्धा जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना , शेखर ठाकरे तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना जगदीश वांदिले वर्धा जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना बच्चू कलोडे (सल्लागार ) महिला सेना शहर अध्यक्ष शितल गेडाम आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला

यावल शहरात व तालुक्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या तिन दिवस लॉकडाऊन सर्वत्र कडकडीत बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तिन दिवसाच्या लॉकडाऊनला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून , सर्वत्र अत्यावश्क आरोग्य विषयी सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पुर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे . दरम्यान मागील एक महीन्यांपासुन जळगाव जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा अत्यंत घातक असा संसर्ग हा वेगाने वाढतांना दिसत असल्याने या कालावधीत अनेक बाधीत रूग्णांचा झपाट्याने मृत्यु होतांना दिसत आहे . दरम्यान यावल तालुक्यात मागील एक महीन्यापासुन कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर पहोचला आहे . या अत्यंत घातक अशा दुसऱ्या टप्यातील कोरोना संसर्गाने थैमान घातले असून , या उद्भभवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी आज दिनांक २८ मार्च पासुन संपुर्ण जळगाव जिल्ह्यात तिन दिवसाचे लॉकडाऊन लावण्यात आले असुन , आज यावल शहरातील संपुर्ण बाजार पेठा , विविध व्यापारी संकुलन आदी दुकाने ही सकाळ पासुनच पुर्णपणे बंद दिसुन येत आहे . यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी आपल्या पोलीस सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षकदलाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने बंदोबस्त चोख पार पाडला , नगर परिषदचे स्वच्छता अधिकारी शिवांनद कानडे , विजय बडे , वरिष्ठ लिपिक वसुली विभाग राजेन्द्र गायकवाड , असदुल्ला खान, मधुकर गजरे , रवी बारी , अनिल चौधरी यांनी ही लॉकडाऊनच्या परिस्थितीवर नजर ठेवुन होते .लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम हा एसटी बसेसवर दिसुन आला असुन , प्रवासांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे अनेक बसेस सेवा यावल आगारातुन कमी करण्यात आल्या आहे .

अखेर सेलू तालुक्यातील अति दुर्गम वलंगवाडी येथिल रस्त्याचे डांबरीकरण सुरू

0

 

सेलू/परभणी अजहर पठाण

सेलू तालुक्यातील ग्रामीण वलंगवाडी ह्या गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दीड किलोमीटर डांबरीकरण सुरू करण्यात आले. येथील गावाला पक्का रस्ताच नसल्यामुळे गावातील नागरिकांचे हाल होतात. रां. मार्ग क्र.253ला लागून पाच की. मी. अंतर असलेल्या या गावात रस्ताच अस्तित्वात नव्हता. येथिल रस्त्याचे नोंद ग्रामीण रस्ते क्र. नव्हते यामुळे या मार्गावर निधी टाकण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. हाच प्रश्न घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ह. भ. प. दगडोबा जोगदंड महाराज यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन शासकीय पातळीवर पाठपुरावा करून जी. प. विभागातर्फे
दीड की. मी. डांबरीकरण मंजूर करून घेतले व कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे काम मार्गी लागल्याने गावकरी मंडळी आनंदित झाली.

शिंदी येथे पारंपारिक पद्धतीने होळी साजरी !कोरोना चा राक्षस कायमचा जावो हीच व्यक्त केली लोकांनी प्रार्थना !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

होळी आणि पुरणाची पोळी असे म्हणतात होळीचा सण सर्वांना आनंद देणारा सण आणि अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी हा सण आल्यामुळे ‘तरीही तोंडाला माक्स चा वापर करून ‘ग्रामीण भागामध्ये पारंपारिक पद्धतीने होळी पेटविण्यात आली ‘या ओळीचा वैशिष्ट्य म्हणजे या होळी मध्ये कोरोना चा हा प्रतीकात्मक विषाणू जाळण्यात आला जाळण्यात आला ।यावेळी लोकांनी आपल्या घरासमोर होळी जाळली ‘यावेळी शिंदी येथील ग्रामपंचायत समोर बद्री वायाळ यांनी पारंपारिक पद्धतीने होळी पेटवली ‘व प्रार्थना केली की कोरोना चे संकट सर्व भारत देशातून निघून जावो ।अशी प्रार्थना त्यांनी केली ‘

ग्राम विस्तार अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे आंदोलन !समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांचे आंदोलन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

वॉर्डातील समस्या निकाली काढण्यासाठी ‘ग्राम विकास अधिकारी यांना समस्या बाबत निवेदन देण्यासाठी मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील नागरिक व महिला गेली असता ‘ग्राम विकास अधिकारी हजर नसल्यामुळे ‘ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीनं नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला !डोणगाव येथील वार्ड क्रमांक सहा व तीन व चार मध्ये नागरिकांना विविध समस्या ला सामोरे जावे लागत आहे ‘म्हणून वॉर्डातील नागरिकांनी .निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत गाठली ‘या निवेदनामध्ये त्यांनी असे दिले आहे की ‘जुन्या शौचालयाचे नूतनीकरण करावे ‘ग्रामपंचायत मधील रिकामे कर्मचारी पद अनुसूचित जाती मधील भरावे ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कांचन मध्ये पर्यंतचा रस्ता मोकळा करून द्यावा !जुना पादन रस्ता मोकळा करून द्यावा ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटिकेचे काय काम झाले ‘ते निकृष्ट दर्जाचे असून ‘त्या झालेल्या कामाची चौकशी करणे व दोषींवर कारवाई करावी ‘व वार्डातील क्रमांक सहा व 3 व4 मधील समस्या तातडीने सोडवाव्यात वरिष्ठ पर्यंत जाऊन ताबडतोब काम मार्गी लावावे ।अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला ‘या निवेदनावर ‘प्रल्हाद खोडके ‘अमोल वाघमारे ।सिद्धार्थ खोडके ।आदींच्या सह्या आहेत ।