mohan bhagwat/:उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहभागातून मोठी सांस्कृतिक आणि समाजिक चर्चा सुरू झाली आहे. प्रतिष्ठित विद्वान आणि सामाजिक नेत्यांशी संवाद साधत असताना,
भागवत यांनी राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक समानतेचे स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामुळे भारतातील विविध समाजाच्या गतिविधींवर विशेष लक्ष केंद्रित होत आहे.
Ram Navami /श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला
भारत माता की जय या घोषणेतून राष्ट्रीय भावनेला अभिव्यक्त करण्यात कसलाही संकोच नसेल आणि भगव्या ध्वजाचा आदर असेल,
या अटीवर मुस्लिम समुदायाच्या लोकांनाही संघाच्या शाखेत सामील होता येईल, असे भागवत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जे लोक स्वतःला औरंगजेबाचे वंशज मानत नाहीत, त्या सर्व भारतीयांना संघाच्या शाखेत स्वागत आहे.
भारतातील विविध धर्मांचे लोक असले तरी सर्वांची संस्कृती सारखीच आहे, हे महत्वाचे विधान त्यांनी केले.
मोहन भागवत यांची वाराणसी दौरा
mohan bhagwat/ वाराणसीमध्ये मोहन भागवतांचे ऐतिहासिक विधान: भगव्याचा आदर असला तर मुस्लिमांनाही संघाच्या शाखेत स्थान
भागवत यांनी वाराणसीच्या दौऱ्यात जातिभेद नष्ट करणे, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि बलशाली समाज निर्माण करणे या विषयांवर भाष्य केले.
mohan bhagwat :त्यांच्या विशेष भेटींमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक नेते सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, मोहन भागवत यांनी भारताला जागतिक नेता बनवण्याच्या उद्देशाने विद्वानांशी चर्चा केली आहे