यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व८६० प्रतिबंधीत क्षेत्र

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , यात कोरोना बाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असुन एक वर्षात सुमारे दोन हजार लोक हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत . दरम्यान मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणी राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु करण्यात आली होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्णहेकोरपावली तालुका यावल येथे तर यावल शहरातही जुन अखेर शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ . सलीम शेख यांचे कुटुंबातील त्यांचा मुलगा हा कोरोना बाधीत आढळुन आला होता , यावेळी पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात एकुण ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र अशी ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली होती. या महामारीच्या कठीन व संकटमय समयी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासना तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने लक्ष वेधणारे असे उल्लेखनिय कार्य केलीत, या कार्यात त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमुल्प सहकार्य मिळाले . यावेळी फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या नागरिक शासन आदेशाची अमलबजावणी साठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे असमरणीय आहे . दरम्यान आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७०पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादादक व आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे , याकरीता वारंवार प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे , सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .

Leave a Comment