घरकुल योजनेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला…(gharkulyojna)

 

संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सरपंच व ग्रामसेवक यांची पाठ राखण….

प्रतिनिधि सय्यद जहीर

gharkulyojna:लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार चालला असून भ्रष्ट कारभाराला ऊत आला आहे.
घरकुल योजनेत तर ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. या भ्रष्ट कारभाराला वेळीच थांबविले नाही तर गरजू व पात्र नागरिकांना घरकुले कशी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)

याबाबत माहिती अशी, शासनाकडून ज्यांना घरे नाहीत अशा गरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेचा हेतू जरी चांगला असला तरी सध्या ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमताने या योजनेत भ्रष्टाचार करून योजनेचा हेतूच संपविण्याचे धोरण आखले आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक संगनमताने ५ हजार ते २५ हजार रुपये घेऊन लाभार्थ्यांची निवड करत आहेत. यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जागेची अट असताना त्यासाठी खोट्या माहितीची पूर्तता करून घरे मंजूर केली जात आहेत. तसेच जागा व्यापून आपल्या नावावर नोंदणी करून घेत आहेत.

एक रेशनिंग कार्ड, नावावर गाड्या दोन,जागा पूर्ण नसताना मंजुरी, त्याचप्रमाणे घरे पूर्ण नसताना उतारे नोंदणी, घर पूर्ण झाल्याचा दाखला, तसेच दारे, खिडक्या, प्लास्टर, शौचालय नसतानाही तीन महिने आधीच खोट्या नोंदणी करून घरकुलांची बिले काढली जात आहेत.बांधलेल्या घरावर सुद्धा घरकुलाच्या नावे पैसे काढून दिल्या जात आहेत.
घरकुल योजनेतील या मनमानी कारभारावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा गरजूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची जर चौकशी केली तर त्यातील निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी योजनेसाठी पात्र नसल्याचेच आढळून येईल.
घरकुल योजनेतील भ्रष्ट कारभाराची सर्व ग्रामपंचायतीतील कर्मचारी, पोलीस पाटील, सत्ताधारी तसेच विरोधक यांनाही याची माहिती असूनही ते गप्प का बसतात? हे कळायला मार्ग नाही.

gharkulyojna:गटविकास अधिकाऱ्यांना याची माहिती नसावी, असे वाटत नाही. निश्चितच तेही या कारभाराला पाठीशी घालतात, अशी नागरिकांचा समज झालेला आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा खऱ्या गरजू व पात्र लाभार्थ्यांना यापुढे लाभ मिळण्यासाठी या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

■ घरकुल मंजूर करणे, घरकुलाचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कोणी नागरिकांना मंजुरीसाठी किंवा हप्ता देण्यासाठी पैसे मागत असेल तर याद राखा. कोणीही पैसे मागितले तर त्याला सोडणार नाही,भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाबाहेर माझा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री

20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट…

प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत.या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.

बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया —
घरकुल मंजुरी,घरकुलाचा हप्ता,नावे कमी जास्त,खाली वर ,खोट्या कागदपत्रांची पूर्तता,बांधलेल्या घरावर पैसे काढून देतो अशा प्रकारच्या कुठल्याही कामासाठी कोणीही आर्थिक व्यवहार करू नये.यासाठी सरपंच,सचिव,कर्मचाऱी,अधिकारी यांना कुठल्याच प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही.कारण घरकुलाची कामेही नियमानुसार करण्यात येणार आहेत.
काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेचा अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडून लाज मागण्याची शक्यता असते अशावेळी कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता लोणार पंचायत समिती कार्यालयात तक्रार करावी.
— श्री उमेश देशमुख,गटविकास अधिकारी पंचायत समिती,लोणार

Leave a Comment