सावखेडा सिम येथील रमाई आवास योजनेचे अपात्र लाभार्थी पात्र कसे झालो गविअ यांनी दिले चौकशीचे आदेश

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीद्वारे मान्यता मिळालेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी दिशाभुल करणारी माहीती प्रशासनाकडे सादर केली असुन , या सर्व प्रकाराची लेखीतक्रार गावातील सामाजीक कार्यकर्ते सुनिल नथ्थु भालेराव यांनी केल्याने तिन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहे . या संदर्भात सावखेडा सिम येथील सुनिल भालेराव यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस .पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , सावखेडासिम गावातील राहणारे अभीजीत दिलीप साळवे व अशोक प्रकाश साळवे या दोघांचे अद्याप लग्न झालेले नसुन ते शिक्षण घेत आहे असे असतांना ही या दोघांच्या नांवाने सन्२०१९-२०या वर्षात ग्रामपंचायतच्या वतीने रमाई आवास योजनेचा लाभ घेत आहे . एकत्रीत कुटुंबात राहात असुन असे असतांना त्यांना घरकुलाची गरज काय ?यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातुन या दोघांच्या घरकुलांना मान्यता मिळाली कशी हाच मुद्दा महत्वाचा आहे . तरी या दोघांचे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल तात्काळ रद्द करण्यात यावे अशी तक्रार सुनिल भालेराव यांनी केली होती, या तक्रारीची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिनांक १९ मार्च रोजी सावखेडा सिम ग्रामपंचायतीला पत्र पाठवुन रमाई आवास योजनेचे लाभ घेणाऱ्या अभिजित साळवे व अशोक साळवे या दोघा लाभार्थ्यांचे रेशनकार्ड वेगवेगळे आहेत का ?त्यांचे कडे स्वताची जागा आहे का ?व ते जर एकत्र कुटुंबात रहिवास करीत असतील तर त्यांच्या कुटुंबाने यापुर्वी घरकुल योजनेचा किंवा दुरुस्तीचा लाभ घेत लाभ घेतला आहे ?याबाबतचा सुधारीत अहवाल तिन दिवसात लेखी स्वरूपात पंचायत समितिकडे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा अश्या स्वरूपाचा लिखित अहवाल सादर करावा असे म्हटले आहे . या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील काय निर्णय घेतात हे विशेष आहे .

Leave a Comment