महावितरण कार्यालया पुढे चालू असलेल्या सोनाळा सरपंच व पांडवसर यांचे उपोषणाची ३ दिवशी लेखी पत्राद्वारे उपोषणाची सांगता……

 

संग्रामपुर- श्याम उमरकर

 

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा व तसेच परिसरातील इतर गावांमध्ये वीज समस्येने गावकरी त्रस्त होते याकरता सोनाळा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश विश्वकर्मा व रामदास पांडव सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावकऱ्यांनी महावितरण कार्यालया समोर १ ऑगस्ट पासून बे मुदत आमरण उपोषणास सुरुवात केली. असता त्यामध्ये संपूर्ण गावाने तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांनी या उपोषणास भेटी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये विद्युत वितरण कंपनीचे अनेक अधिकारी यांनी भेटी देऊन उपोषणकर्त्याची मन धारणी केली तरी सुद्धा त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.

 

 

अखेर राष्ट्रवादी पक्षाचे प्रसन्नजीत पाटील यांनी उपोषण मंडपात भेट देऊन अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याकरता महावितरण चे अधिकारी मुळे व बोदळे यांनी लेखी पत्र द्यावे असे खडे बोल लावत उपोषण कर्त्याचे मागण्या पूर्ण केल्या. सायंकाळच्या सहा वाजता उपोषणाची लेखी पत्र देवुन मागणी पूर्ण करण्यात आल्या.उपोषणामध्ये गावाचे सरपंच तसेच पांडव सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील गजानन साबळे , मनोज अमनकर प्रमोद इंगळे ,गोविंद देशमुख व अनेक जणांनी उपोषणामध्ये सहभागी झाली होती यामध्ये ३ आगस्ट रोजी गोविंद देशमुख यांची परिस्थिती खालावल्यामुळे त्यांना दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते .या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी भेटी तसेच पाठिंबा नोंदविला होता. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने तालुका अध्यक्ष भाजपा लोकेश जी राठी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजीव वानखडे मनसे अध्यक्ष शिवा भोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीकर व
सोनाळा पोलिस स्टेशन चे ठाणेदार गुट्टे तालुका वैद्यकीय अधिकारी रोजतकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रसन्नजीत पाटील यांनी भेट घेऊन उपोषणाची सांगता केली. या उपोषणाकरता गावातील अनेक गावकऱ्यांनी यामध्ये आपले सहकार्य नोंदवले गावातील प्रमोद खोडे, गोपाल केणेकर, पप्पू सुरळकर, मुन्ना शेंडे, पवन शेंडे, प्रकाश गोतमारे, शरद लव्हाळे, रमजान भारसाकडे , उमेश भारसाकळे,ललित सावळे, उपसरपंच व इतर लोकांनी यामध्ये आपले सहकार्य नोंदविले आहे.

 

Leave a Comment