प्रकाश राऊत यांनी लहान मुला मुलींना पळून नेणारी टोळी हिंगणघाट शहरात सक्रिय झाली अशी माहिती उघड केली

हिंगणघाट :- सध्या शहरात
लहान मुलांना पळून नेणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण ,शहरी भागातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मुलांना पळून नेणारी टोळी शहरात आली आहे. लहान मुलांना पळवून नेत असल्याचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल असून यामध्ये पुरुष व महिला असून
हे लहान मुलांचे अपहरण करत आहे. या टोळ्यापासून मुलांना धोका असल्याचे सांगत असून लहान मुलांना सांभाळण्यात यावे असे सांगितले जात असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे मात्र प्रत्यक्षात मुलांना पळून नेणारी अशी कुठलीही टोळी सक्रिय असल्याचे समोर आलेले नाही परंतु ही गोष्ट सत्य आहे अशी माहिती प्रकाश राऊत माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणातील सत्यता समोर आणली त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली
हिंगणघाट शहरा मध्ये दोन दिवसा अगोदर घडलेली घटना एका मुली चे अपरहण होता होता टळले .
घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली . माझी मुलगी तिच्या मैत्रिणी सोबत घडलेली घटना माझ्या मुलीने मला सांगितली , सरकारी दवाखाना जवळील सरकारी गोडाऊन जवळून माझी मैत्रीण जात असताना तिथे अनोळखी स्त्री आली व तिने तिचा हात पकडला व सोबत चल तुझ्या घरी अशी म्हणू लागली व एका गाडीकडे पाहून इशारा केला . मुलीने हात झटकून लगेच पळ काढला त्यामुळे ती पूर्णपणे घाबरली ,तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली घडलेल्या प्रकार माझ्या मुलीने मला सांगितला. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कर असे सांगितले. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे. व सध्या विदर्भात अनेक शहरात लहान मुलं मुली पळविण्याचे प्रकार सुरू आहे अशा घटना घडत आहे व सोबत अफवा सुद्धा होत आहे त्यामुळे या प्रकारच्या घटना घडू नये व शहरातील जागरूक पालक व मुला मुलींनी याबद्दल सतर्क असणे आवश्यक आहे. अशा घटनेपासून सावध असणे आज आवश्यक आहे. या प्रकरणाची दखल घेऊन एक सामाजिक कर्तव्य म्हणून याबद्दल शहरातील शाळेमध्ये जाऊन मुला मुलींनी अनोळखी व्यक्ती पासून सावध राहावे तसा काही संशय असल्यास पोलीस स्टेशन
07153 :- 244033, हिंगणघाट येथे संपर्क करावा
हिंगणघाट शहरात प्रत्यक्ष शाळेत मुला-मुलींना याबद्दल अशा घटना आपल्या सोबत सुद्धा घडू शकतात व याची काळजी घ्यावी व यावर मार्गदर्शन करावे त्या अनुषंगाने मी एस.एस. एम. कन्या विद्यालय ,हिंगणघाट. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सतर्क राहा,सावधान राहा. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. अस काहीं वाटलं तर माझ्या फोन वर संपर्क करावे:9823748771 ,मी सदैव सोबत राहील

Leave a Comment